दुचाकी वाहनांना महामार्गांवर टोल भरावा लागणार नाही; खोटा दावा व्हायरल

False Social

राष्ट्रीय महामार्गांवर 15 जुलैपासून दुचाकी वाहनांनाही महामार्गांवर टोल भरावा लागेल, असा दावा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल दावा खोटा आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल पोस्टमध्ये लिहिले आहे की, “१५ जुलै २०२५ पासून दुचाकी वाहनांनाही राष्ट्रीय महामार्गावर टोल भरावा लागणार ! राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) नव्या धोरणानुसार, १५ जुलै २०२५ पासून दुचाकी वाहनांना टोल माफ राहणार नाही.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल दावा खोटा असून केंद्रीय परिवहन मंत्री आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही.

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी व्हायरल दाव्याचे खंडण करताना ट्विटमध्ये लिहिले होते की, “काही माध्यमे दुचाकी वाहनांवर टोल कर लावण्याबाबत दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवत आहेत. असा कोणताही निर्णय प्रस्तावित नाही. दुचाकी वाहनांना टोलमध्ये पूर्णपणे सूट राहील.सत्य जाणून न घेता खोट्या बातम्या पसरवणे आणि खळबळ निर्माण करणे हे निरोगी पत्रकारितेचे लक्षण नाही. मी याचा निषेध करतो.”

ट्विटर

या ट्विटसोबत नितीन गडकरी टीव्ही9 भारतवर्ष या न्यूज चॅनलचा ट्विटर आयडी मेंशन करताना दिसतात.

खरं तर टीव्ही9 भारतवर्षने बातमी दिली होती की, “15 जुलैपासून दुचाकी वाहनांनाही राष्ट्रीय महामार्गांवरुन जाताना टोल भरावा लागेल.” 

नितीन गडकरी यांनी टीव्ही9 भारतवर्ष या न्यूज चॅनलची ट्विटर आयडी मेंशन करत ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केले. या नंतर टीव्ही9 भारतवर्षने आपली चूक मान्य करत असा कोणताही निर्णय प्रस्तावित नसून दुचाकी वाहनांना टोल नाही, अशी सुधारीत बातमी दिली.

मूळ पोस्ट – युट्यूब | आर्काइव्ह

एनएजएआयचे खंडण

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने व्हायरल दाव्याचे खंडण करत ट्विट केले की, “काही माध्यमांनी असे वृत्त दिले आहे की भारत सरकार दुचाकी वाहनांवर वापरकर्ता शुल्क आकारण्याची योजना आखत आहे.हे स्पष्ट करू इच्छिते की असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. दुचाकी वाहनांसाठी टोल आकारण्याची कोणतीही योजना नाही.”

ट्विटर 

दुचाकी महामार्गावर बंदी

सुरक्षेच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्गांवर सायकल, दुचाकी आणि तीनचाकी वाहनांना बंदी आहे. सविस्तर बातमी येथे, येथेयेथे वाचू शकता.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाच्या ‘महामार्ग गाईडलान’नुसार एक्सप्रेसवे नेटवर्कवर, फक्त किमान चार चाकी असलेल्या मोटार वाहनांना परवानगी आहे. दोन/तीन चाकी, सायकली किंवा प्राण्यांनी ओढलेली वाहने प्रतिबंधित आहेत. अशा वाहनांना थांबवण्यात येईल आणि त्यांना इतर मार्गांनी जाण्याचा सल्ला/निर्देश देण्यात येईल.

महामार्ग गाईडलान

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल दावा खोटा असून केंद्रीय परिवहन मंत्री आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. खोट्या दाव्यासह हा मेसेज व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:दुचाकी वाहनांना महामार्गांवर टोल भरावा लागणार नाही; खोटा दावा व्हायरल

Fact Check By: SAGAR RAWATE 

Result: False


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *