
स्वतःच्या मालकीची दुचाकी किंवा चारचाकी गाडी असेल आणि तुम्ही शिधापत्रिकेवरून स्वस्त धान्य घेत असाल तर लवकरच तुमचा धान्य पुरवठा बंद होऊ शकतो. राज्यातील साधारण 25 लाखांपेक्षा जास्त शिधापत्रिका रद्द होण्याची शक्यता आहे, अशी एक पोस्ट जनलोक टाईम्स या पेजवर पोस्ट करण्यात आली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
स्वतःच्या मालकीची दुचाकी किंवा चारचाकी गाडी असेल आणि शिधापत्रिकेवरून स्वस्त धान्य घेत असाल तर लवकरच तुमचा धान्य पुरवठा बंद होऊ शकतो, या बाबीची सत्यता पडताळण्यासाठी आम्ही सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आम्ही गेलो. या ठिकाणी मराठीत असलेली खालील माहिती आम्हाला दिसून आली.
महाराष्ट्र सरकारचे संकेतस्थळ / Archive
हे परिपत्रक डाऊनलोड केले असता यात स्पष्टपणे म्हटले आहे की, शिधापत्रिका
धारकांच्या दुचाकी व चारचाकी वाहन तसेच जमिनीची मालकी असल्यास कुटुंबाची शिधापत्रिका रद्द करण्याचा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही. वाचक www.maharashtra.gov.in या महाराष्ट्र सरकारच्या संकेतस्थळावर 201907171215397806 हा सांकेतांक क्रमांक टाकून हे परिपत्रक डाऊनलोड करु शकता. त्यामुळे स्वतःच्या मालकीची दुचाकी किंवा चारचाकी गाडी असेल आणि शिधापत्रिकेवरून स्वस्त धान्य घेत असाल तर लवकरच तुमचा धान्य पुरवठा बंद होऊ शकतो, ही बाब खोटी असल्याचे दिसून येत आहे.
निष्कर्ष
स्वतःच्या मालकीची दुचाकी किंवा चारचाकी गाडी असेल आणि शिधापत्रिकेवरून स्वस्त धान्य घेत असाल तर लवकरच तुमचा धान्य पुरवठा बंद होऊ शकतो, ही बाब असत्य असल्याचे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत सिध्द झाले आहे. महाराष्ट्र सरकारनेही याबाबत परिपत्रक काढले आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळून आली आहे.

Title:Fact Check : दुचाकी असल्यास शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय का?
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
