
सौर ऊर्जेस प्राधान्य दिल्याने सुर्य थंडावेल असे वक्तव्य प्रियंका चतुर्वेदी यांनी केल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
तथ्य पडताळणी
फेसबुकवर शेअर करण्यात येत असलेल्या या फोटोच्या एका कोपऱ्यात आम्हाला द फियरलेस इंडियन असे लिहिलेला आम्हाला दिसून आले. हे नेमके काय आहे याचा शोध घेतला असता ते फेसबुकवरील एक पेज असल्याचे आमच्या लक्षात आले. देवांग दवे (आक्राईव्ह लिंक) हे हे पेज चालवत असल्याचे दिसून आले. ते भारतीय जनता युवा मोर्चाचे आयटी आणि सोशल मीडिया सेलचे संयोजक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्यानंतर आम्ही प्रियंका चतुर्वेदी यांनी सौर उर्जेबाबत काही वक्तव्य केले आहे का, याचा शोध घेतला असता आम्हाला त्यांनी याबाबत काही वक्तव्य केल्याचे कुठेही दिसून आले नाही. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 84 व्या महाअधिवेशनात बोलताना त्यांनी उज्वला योजनेवर टीका केल्याचे दिसून येत आहे. त्यांनी यात सरकारच्या सौर उर्जेच्या धोरणाबाबत काही म्हटलेले नाही. याचा व्हिडिओ आपण खालील लिंकवर पाहू शकता.
प्रियंका चतुर्वेदी यांनी खरेच असे वक्तव्य केले आहे का? याची तथ्य पडताळणी करण्यासाठी आम्ही प्रियंका चतुर्वेदी यांच्या ट्विटर अकाऊंटवर गेलो त्या ठिकाणी त्यांचे खालील लिंकमध्ये दिलेले ट्विट आम्हाला दिसून आले. या ट्विटमध्ये त्यांनी भाजपकडून आणखी काय अपेक्षा काय करु शकतो, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
निष्कर्ष
प्रियांका चतुर्वेदी यांनी सौर उर्जेच्या वापराबाबत कोणतेही वक्तव्य केल्याचे दिसून येत नाही. त्यांनी उज्वला योजनेच्या यशाबद्दल मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळून आली आहे.

Title:सत्य पडताळणी : सौर ऊर्जेस प्राधान्य दिल्याने सुर्य थंडावेल, प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या होत्या का?
Fact Check By: Dattatray GholapResult: False
