भारतरत्न'वर निव्वळ सवर्ण आणि ब्राह्मणांची मक्तेदारी : ओवैसी
भारतरत्न विषयावरील ओवेसींची टीका
परिचय
भारतीय राजकारणात टीकेची झोड कधी कुणावर आणि कोणत्या विषयावर होईल याबदल, कशाचीही शाश्वती देता येणार नाही. टीका करतांना राजकारणात विषयांचे बंधन कधीच राहत नाही असे दिसून आलेले आहे. सध्या विविध वृत्तपत्रांमध्ये एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी भारतरत्न पुरस्कार या विषयावर जोरदार टीका केल्याची बातमी झळकत आहे. त्यामुळेच खासदार ओवेसी यांच्या टीकामधील तथ्य जाणून घेण्याचा आम्ही केलेला हा प्रयत्न.
कथन
भारतीय राजकारणात कोण कुणावर कोणत्या विषयावर टीका करेल काही सांगता येत नाही. एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना भारतरत्न म्हणजे सवर्ण आणि ब्राह्मणांचा क्लब असल्याचं वादग्रस्त विधान केले आहे. देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देताना पारदर्शकता पाळली जात नाही, असा आरोप ओवेसी यांनी केला. तसेच इतर काही ठिकाणी भाषण देतांनाही त्यांनी भारतरत्न या विषयावर वादग्रस्त विधाने केली आहेत.
भारतरत्न विषयावर टीका करतांना ओवेसी यांनी किती दलित, आदिवासी, मुस्लिम यांना आतापर्यंत भारतरत्न देण्यात आला?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देण्यात आलेल्या भारतरत्न पुरस्कारावरही ओवेसींनी भाष्य केलं. आंबेडकर यांना नाखुशीनं भारतरत्न देण्यात आला. सरकारला गरज वाटली म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला, असा दावा त्यांनी केला.
Times of India l Times Now l Lokmat
तथ्य पडताळणी
- भारतरत्न पुरस्कार बद्दल माहिती
भारतरत्न हा भारतीय गणराज्याचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. मुळात हा पुरस्कार हा एखाद्या व्यक्तीच्या कार्यक्षमतेच्या आधारावर देण्यात येतो. १९५४ पासून भारतरत्न पुरस्कार देण्याची सुरुवात झाली. सुरुवातीला हा पुरस्कार केवळ साहित्य, कला, विज्ञान, आणि सार्वजनिक सेवांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्यांनाच दिला जात असे. पण २०११ पासून या नियमात बदल करून, आता हा पुरस्कार मानवी प्रयत्नांचे कोणतेही क्षेत्र यासाठी दिला जातो. विशेष म्हणजे हा पुरस्कार देताना पहिला नियम असा आहे की, या पुरस्कारासाठी निवड झालेल्या व्यक्तीची निकष हि कोणत्याही जातीभेद, वर्णभेद, आर्थिक स्थिती भेद, किंव्हा लिंगभेद यांच्या परे आहे. त्यामुळे हा पुरस्कार सर्वोच्च पुरस्कार मध्ये समाविष्ट होतो. भारतरत्न हा पुरस्कार केवळ भारतीय नागरिकत्व असणाऱ्या व्यक्तीलाच मिळतो असे नाही तर, आत्तापर्यंत दोन आंतरराष्ट्रीय व्यक्तींनाही हा पुरस्कार देण्यात आला आहे.
आता प्रश्न आहे की, खासदार ओवेसी यांनी केलेल्या टीकेनुसार काय भारतरत्न हा पुरस्कार म्हणजे सवर्ण आणि ब्राह्मणांचा क्लब असे आहे का? याचे उत्तर असे आहे की, मुळात भारतरत्न पुरस्कार हा जातीभेद आणि लिंगभेद यावर आधारित कधीच देण्यात येत नाही.
याशिवाय आत्तापर्यंत एकूण ४५ व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. खरेतर भारतरत्न पुरस्कार देणाऱ्या व्यक्तीच्या जाती बद्दल उल्लेख करणेच चुकीचेच आहे. कारण हा पुरस्कारच कोणत्या विशिष्ट जाती बद्दल नाहीये. परंतु खासदार ओवेसी यांच्या टीकेचे तथ्य जाणून घेण्याच्या प्रयत्नातून समोर आलेल्या गोष्टी अशा आहेत.
आत्तापर्यंत मुस्लीम समाजातील (६) सहा जणांना पुरस्कार मिळाला आहे, तर इतर समाजातील अनेक व्यक्तींना देखील या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Bharat Ratna Award Winners
S.No. | Name of the Awardees | Year |
1 | Shri C. Rajagopalachari | 1954 |
2 | Dr.Sarvepalli Radhakrishnan | 1954 |
3 | Dr.C. V. Raman | 1954 |
4 | Dr.Bhagwan Das | 1955 |
5 | Dr.M Visvesvaraya | 1955 |
6 | Pt. Jawaharlal Nehru | 1955 |
7 | Pt. Govind Ballabh Pant | 1957 |
8 | Dr.Dhondo Keshav Karve | 1958 |
9 | Dr.Bidhan Chandra Roy | 1961 |
10 | Shri.Purushottam Das Tandon | 1961 |
11 | Dr.Rajendra Prasad | 1962 |
12 | Dr.Zakir Husain | 1962 |
13 | Dr.Pandurang Vaman Kane | 1963 |
14 | Shri Lal Bahadur Shastri (posthumous) | 1966 |
15 | Smt.Indira Gandhi | 1971 |
16 | Shri V. V. Giri | 1975 |
17 | Shri K. Kamaraj(posthumous) | 1976 |
18 | Mother Teresa | 1980 |
19 | Shri Acharya Vinoba Bhave | 1983 |
20 | Khan Abdul Ghaffar Khan | 1987 |
21 | Shri M. G. Ramachandran | 1988 |
22 | Dr.B. R. Ambedkar | 1990 |
23 | Nelson Mandela | 1990 |
24 | Shri.Rajiv Gandhi (posthumous) | 1991 |
25 | Sardar Vallabhbhai Patel (posthumous) | 1991 |
26 | Shri Morarji Desai | 1991 |
27 | Maulana Abul Kalam Azad (posthumous) | 1992 |
28 | Shri J. R. D. Tata | 1992 |
29 | Shri Satyajit Ray | 1992 |
30 | Shri Gulzarilal Nanda | 1997 |
31 | Smt.Aruna Asaf Ali(posthumous) | 1997 |
32 | Dr.A. P. J. Abdul Kalam | 1997 |
33 | Smt.M. S. Subbulakshmi | 1998 |
34 | Shri Chidambaram Subramaniam | 1998 |
35 | Loknayak Jayaprakash Narayan (posthumous) | 1999 |
36 | Professor Amartya Sen | 1999 |
37 | Lokpriya Gopinath Bordoloi (posthumous) | 1999 |
38 | Pandit Ravi Shankar | 1999 |
39 | ShushriLata Mangeshkar | 2001 |
40 | Ustad Bismillah Khan | 2001 |
41 | Pandit Bhimsen Joshi | 2009 |
42 | Professor C. N. R. Rao | 2014 |
43 | Shri Sachin Tendulkar | 2014 |
44 | Pandit Madan Mohan Malaviya (posthumous) | 2015 |
45 | Shri Atal Bihari Vajpayee | 2015 |
46 | Pranab Mukherjee | 2019 |
47 | Bhupen Hazarika | 2019 |
48 | Nanaji Deshmukh | 2019 |
निष्कर्ष :
एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी भारतरत्न पुरस्कार या विषयावर जी टीका केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही, कारण भारतरत्न पुरस्कार हा कोणत्याही जातीभेद, लिंगभेद, वर्णभेद, आणि आर्थिकस्थितीभेद वर आधारित नसून, केवळ व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर आधारित आहे. आणि आत्तापर्यंत मुस्लीम समाजातील सहा व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Title: भारतरत्न'वर निव्वळ सवर्ण आणि ब्राह्मणांची मक्तेदारी : ओवैसी" Fact Check By: Amruta Kale Result: False |